ऑगस्ट 2020 मध्ये स्वातंत्र्य दिनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करत असल्याचं सांगितलं. भारतात मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय 18 वर्षे तर मुलांचे 21 वर्षे आहे.
परंतु आता मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करून ते 21 वर्षं करण्याचा सरकारने निर्णय घेतला. जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने जवळपास 16 विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चर्चा करून वय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा कारणांचा शोध घेऊन एक अहवाल सादर केला.
या अहवालामध्ये पंधरा NGO देखील सहभाग घेतला. सर्व धर्माच्या आणि सर्व वयाच्या मुलींची माहिती घेऊन हा अहवाल त्यांनी बनवलेला,मुलींचा आरोग्य चांगलं राहावं मूल जन्माला घालण्यात अडचण येऊ नये जन्माला येणारी मुले सुदृढ व्हावी व बालमृत्यू दर कमी व्हावा अशा कारणांसाठी हे लग्नच आणि मुलींनी गरोदर होण्याचे वय 18 वर्षे वरून एकवीस वर्ष व्हावं या सर्वासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
परंतु हे सर्व ऐकायला खूप छान वाटत असले तरी हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही, तर प्रचंड गुंतागुंतीचे आहे. मुलींच्या लग्नाच्या या वाढवलेल्या वया संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल आपणास काय वाटते ते खाली कॉमेंट करून नक्की सांगा !
Comments
Post a Comment