हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सहयाद्री च्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटी पासून सुमारे 820 मीटर म्हणजे दोन हजार सातशे फूट उंची वर आहे.मराठा साम्राज्याचा इतिहासात याची खास ओळख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी याची ओळख पाहून सतराव्या शतकात याला राजधानी बनविली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक याच ठिकाणी झाला. या गडाचे सर्व बांधकाम हिरोजी इंदलकर यांनी केले तसा ऐका पाहिरीवर उल्लेख सापडतो.
पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण तीन वाटा आहेत चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, आणि रोप वे, चित्त दरवाजातून गडावर येण्यासाठी सुमारे चौदाशे ते पंधराशे पायऱ्या आहेत.
रायगड हा पूर्वी रायरी चा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता हा रायरी सुरुवातीला जावळी च चंदर राव मोरे यांच्या कडे होत प्रताप गडाच्या पायथ्याशी जावळी च खोर आहे तिथले हे मोरे, ते आदिल शाही चे सरदार होते.
1656 साली महाराजांनी हा प्रांत जिंकून घेतला 1656 ते 1670 पर्यंतर गडाचे बांधकाम सुरू होते होरीजी इंदलकर हे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख यांनी हा किल्ला बांधून काढला चौदा वर्षात गडावर तीनशे पन्नास इमारती बांधल्या.
याच गडावर महाराजांचा राजदरबार व सिंहासन पाहायला मिळते खर तर 6 जून 1674 ला याच गडावर महाराजांचा राजभिषेक संपन्न झाला,असा हा महान रायगड आपल्या महाराष्ट भूमी ला लाभला याचा सार्थ अभिमान वाटतो.
Comments
Post a Comment