वडापाव म्हणलं की आजही मुंबई टॉप वर आहे. वडापाव चा निसंकोच शोध हा मुंबईतच लागला असावा. आता हा शोध कसा लागला?? तर त्यासाठी आपल्याला मुंबईतील गिरणी कामगारांना श्रेय द्यावे लागेल. मुंबईच्या गिरणी कामगारांची पोटाची भूक कमी वेळात भागवता यावी या गरजेपोटी वडापाव हा प्रसिद्ध झाला.
1966 साली दादर स्टेशनच्या बाहेर पहिला वडापाव हा विकला गेला. अशोक वैद्य हे त्या वडापाव गाड्याच्या मालकाचे नाव आणि अशोक वैद्य यांनाच वडापाव चे जनक म्हणायला अता काहीही हरकत नाही. त्यानंतर मुंबईत मराठी माणसांची चळवळ उभा राहिली स्थानिकांच्या नोकऱ्या, स्थानिकांचे हक्क, आणि यासोबतच स्थानिकांचे अन्न सुद्धा महत्त्वाचे ठरू लागले.
दक्षिणेकडून आलेल्या लोकांना त्यांचा विरोध म्हणून त्यांच्याकडून इडली,डोसा असे पदार्थ विकत घेण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आणि मराठमोळ्या लोकांनी आपला मोर्चा थेट वडापाव कडे वळवला. शिवसेनेने देखील या अस्सल मराठमोळी पदार्थाला प्रमोट केलं आणि मुंबईत एक उत्तम वडापाव तयार करण्याचं एक जाळं विणलं गेलं.
हळूहळू कोणी खास चटणीसाठी फेमस झालं तर कोणी जम्बो वडापाव साठी कोणी वडापाव सोबत झणझणीत मिरची देऊ लागलं तर कोणी चुरा देण्याची स्टाईल आणली. अशोक वैद्य यांनी तयार केलेला वडापाव आता महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे काहीजण असे म्हणतात तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी वडापाव चा शोध लावला आता या गोष्टीला काही सबळ पुरावे नाहीयेत...
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हि खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन मराठी भन्नाट गोष्टींसाठी आपल्या Mostly मराठी ब्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा🙏
Comments
Post a Comment